दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी प्रोत्साहन देणे म्हणजेच आर्थिक मदत देणे फक्त अश्यासाठी Divyang Vivah Protsahan Yojana नसून समाजामधील दिव्यांग लोकांविषयी किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्यासाठी हा केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. कारण अनेकदा दिव्यांग लोकांना त्यांच्या विवाहासाठी नकार देण्यात येत असतो किंवा त्यांच्या कडे फक्त सहानुभूती याच भावनेतून बघितले जाते आणि अशा या परिस्थितीमधे महाराष्ट्रातील सरकारने चालू केलेली ही योजना दिव्यांग लोकांना आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारी ठरत आहे. त्यांच्या विवाहानंतर नवीन दामपत्याला आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचे पुढचे आयुष्य हे आणखीनच सुरक्षित आणि स्थिर होते.
महत्वाचं म्हणजे Divyang Vivah Protsahan Yojana अंतर्गत दिव्यांग-अव्यांग याच्या विवाहासोबतच दिव्यांग-दिव्यांग यांच्या लग्नासाठी सुधा प्रोत्साहन दिले जाते. यामुळेच दिव्यांग लोकांना स्मान असल्याची आणि सन्मानपूर्ण वागणूक मिळते आणि या योजनेतून हाच सरकारचा मुख्य प्रयत्न यातून दिसून येतो. आता आजच्या मॉडर्न वेळेत खूप सारे दिव्यांग युवक आणि युवती नोकरी, शिक्षण आणि व्यवसायामध्ये स्वतःचे स्थान तयार करत आहेत आणि ह्याच कारणामुळे सर्व समाजानेही त्यांच्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
Divyang Vivah Protsahan Yojana या अंतर्गत द व्यक्तिंना भेटणारी आर्थिक मदत नवीन दांपत्यासाठी खूप मोठा आधार बनू शकते कारण अनेक असे कुटुंब आहेत ज्यांची आर्थिक स्थिती ही खूप जास्त कमकुवत असल्या कारणाने त्यांना त्यांच्या विवाहाचा खर्च करणे फारच कठीण जत असते. अशा परिस्तीत सरकारकडून भेटणारे 1.50 लाख रुपये ते 2.50 लाख रुपयांचे अनुदान त्यांच्यासाठी खूप मोठी मदत ठरत असते. खासकरून गाव खेड्यात राहणाऱ्या भागातील दिव्यांग लोकांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो.
महत्वच म्हणजे महाराष्ट्र सरकारने Divyang Vivah Protsahan Yojana योजनेत DBT(Direct Benefit Transfer) या प्रकारचा वापर केलेला असल्यामुळे अनुदानात मिळणारी सर्व रक्कम ही थेट योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यामधे वर्ग केली जाते. ह्याच कारणामुळे यामध्ये पारदर्शकता वाढते सोबतच दिव्यांग लाभार्थ्यांना थेट याचा फायदा मैयात असतो. त्याचबरोबर या योजनेतील अनुदानातील निम्मी म्हणजे 50% रक्कम ही मुदत ठेव स्वरूपात ठेवण्याची अट आहे त्यामुळे पुढे भविष्यात लागणारी आर्थिक सुरक्षितता तयार होते.
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना म्हणजे काय?
Divyang Vivah Protsahan Yojana ही महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागा कडून चालवली जाते, महाराष्ट्र सरकार ची ही योजना त्याच्या आयुष्याला एक नवीन आणि सुंदर सुरुवात देऊ शकते. या योजनेचा सर्वांत मोठा हेतू म्हणजे आपल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना लग्नासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचा नवीन आयुष्यासाठी आर्थिक आधार देणे.
आज आपल्या समाज मधे अपंग/दिव्यांग लोकांबद्दल बरेच गैरसमज आपण बघतो. आणि ह्या कारणामुळे बऱ्याच दिव्यांग युवक युवतींना लग्न जमवण्यात खूप अडचणी येतात आणि त्यांच्या आयुष्यातील हीच अडचण दूर व्हावी, हा या योजनेचा मोठा उद्देश आहे.
आपल्या समाजाचा हा जुना दृष्टिकोन बदलावा आणि दिव्यांग लोकांना भेदभावाशिवाय समाजाच्या बाकी लोकं सारखी वागनुक मिळावी हाच Divyang Vivah Protsahan Yojana योजनेमागील शासनाचा खरा हेतू आहे, ही योजना केवळ लग्न जुळवून येण्यासाठी नाहीये तर पूर्ण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आणि दिव्यांग जोडप्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा देणारी योजना आहे.
या योजनेत किती आर्थिक मदत मिळते?
तुमच्या विवाहाच्या प्रकारानुसार यात आर्थिक मदत वेगळी असू शकते जसे.
जस की दिव्यांग आणि अव्यांग विवाह असेल तर 1 लाख 50 हजार दिले जातात.
आणि दिव्यांग आणि दिव्यांग विवाह असला तर 2 लाख 50 हजार दिले जातात.
ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या मदतीने जमा केली जाते.
महत्त्वाची सूचना:
50% रक्कम FD मध्ये ठेवावी लागते
Divyang Vivah Protsahan Yojana योजनेत मिळालेल्या अनुदानापैकी 50% रक्कम 5 वर्षांसाठी मुदत ठेव (Fixed Deposit) म्हणून ठेवावी लागते, याचा मागे शासनाचा उद्देश असा काही की भविष्यात त्या दाम्पत्याला आर्थिक सुरक्षितता मिळावी.
या योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेमागील सर्वांत महत्त्वाचे उद्देश म्हणजे:
दिव्यांग व्यक्तींना लग्नासाठी प्रोत्साहन देणे, अपंग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा मिळावी, त्यांच्या बद्दल असलेला समाजातील नकारात्मक दृष्टिकोन बदलावा, त्यांना लग्नानंतर आर्थिक मदत देणे, दिव्यांग महिलांवरचा भेदभाव कमी करणे, दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यासाठी मदत करणे.
कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो?
Divyang Vivah Protsahan Yojana साठी शासनाने काही महत्त्वाच्या अटी बनवल्या आहेत.
कमीत कमी 40% दिव्यांगत्व असले पाहिजे
वधू किंवा वर यांच्याकडे कमीत कमी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असले पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
तुमच्या कडे UDID कार्ड असले पाहिजे
अर्ज करणाऱ्या व्यक्ती कडे वैलिड UDID कार्ड किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र असले पाहीजे.
महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
जोडप्या मधे कोणीतरी एक हे महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे तेवाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
विवाह नोंदलेला असला पाहिजे
विवाह नोंदणी प्रमाणपत्राशिवाय तुमचा अर्ज एक्सेप्ट केला जाणार नाही, विवाह हा कायदेशीर पद्धतीने आणि नोंदणीकृत पद्धती मधे झालेला असला पाहिजे.
अर्जाची मुदत
लग्नाच्या एका वर्षात तुम्ही अर्ज करू शकतात, त्या नंतर जर अर्ज केला तर तो स्वीकारला जाणार नाही.
पहिला विवाह असावा
Divyang Vivah Protsahan Yojana फक्त पहिल्या लग्नासाठी लागू आहे, जर कोणी घटस्फोटीत असेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटू शकतो फक्त त्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
Divyang Vivah Protsahan Yojana साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे गरजेचे असतात.
UDID कार्ड किव्वा दिव्यांगत्व सर्टिफिकेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, संयुक्त बँक खात्याचा तपशील, बँक पासबुकची झेरॉक्स, महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
Divyang Vivah Protsahan Yojana साठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या प्रमाणे असते.
अर्ज भरावा लागतो, शासनाने दिलेल्या नमुन्यात तुम्हाला अर्ज भरावा.
कागदपत्रे जोडावी लागतात तुम्हाला तुमच्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडवी लागतात.
जिल्हा कार्यालयात अर्ज जमा करावा लागतो म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात जमा करावा लागतो.
अर्जांची तपासणी होते, जिल्हास्तरीय अधिकारी तुमच्या पूर्ण अर्जांची तपासणी करतात.
लाभार्थी निवड होत, जे अर्जदार पात्र असतात त्यांची निवड समिती कडून केली जाते.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत GR
अधिकृत वेबसाइट
लाभार्थी निवड समितीमध्ये कोण असतात?
Divyang Vivah Protsahan Yojana साठी जिल्हास्तरावर एक सेपरेट समिती तयार केली जाते आणि या समिती मधे पुढील अधिकारी असतात.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण आणि सोबतच दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी, हे सर्व अधिकारी असतात.
अर्ज किती दिवसात मंजूर होतो?
शासनाने दिलेल्या माहिती नुसार अर्ज प्राप्त झाल्यांतर ३० दिवसाच्या आत तपासणी प्रक्रिया पूर्ण होते.
Divyang Vivah Protsahan Yojana योजनेचे फायदे
अपंग लोकांना Divyang Vivah Protsahan Yojana मुळे बरेच फायदे होतात.
लग्नासाठी आर्थिक मदत मिळते, दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुधरते, समजत त्यांचा स्वीकार वाढतो, दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास मिळतो, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.
निष्कर्ष
थोडक्यात सांगायचे तर, महाराष्ट्र सरकारची Divyang Vivah Protsahan Yojana ही काय फक्त एक कागदावरची योजना नाहीये तर ह्या योजनेचा हेतू आहे की यामुळे आपल्या समजत एक मोठा बदल घडून यावा. आज सुद्धा आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींना कमी समजले जात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या एका मोठ्या निर्णयाचा वेळेस म्हणजे लग्नाच्या वेळी खूप अडचणी येत असतात. अशा वेळेस ही योजना त्यांना फक्त पैशांची मदत करत नाही, तर समाजात ताठ मानेने जगण्याचा एक मोठा आत्मविश्वास आणि आधार देते. आज अनेक दिव्यांग तरुण आणि तरुणी शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात स्वतःच्या हिमतीवर पुढे जात आहेत आणि त्यांना आपल्या समाजात बाकी साधारण लोकांसारखा सन्मान मिळवून देण्यासाठी Divyang Vivah Protsahan Yojana हा सरकारचा एक प्रयत्न आहे.
Divyang Vivah Protsahan Yojana योजनेमुळे लग्न ठरवताना दिव्यांग जोडप्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांचा खूप मोठा तान कमी होतो, कारण सरकारकडून मिळणारे ₹1.50 लाख ते ₹2.50 लाखांपर्यंतचे अनुदान या नवीन जोडप्याला त्यांचा संसार सुरू करण्यासाठी खूप उपयोगात पडत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कोणतीही फसवणूक होत नाही म्हणून ही सर्व रक्कम (DBT) च्या मदतीने डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, यामुळे सगळी प्रक्रिया सोपी राहते आणि सर्व पैसे थेट गरजू लोकांपर्यंत पोहोचतात. ही मदत त्यांच्या भविष्याला एक प्रकारे आर्थिक सुरक्षा देते.
म्हणूनच, आपल्या आसपास, कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी Divyang Vivah Protsahan Yojana योजनेसाठी पात्र दिव्यांग व्यक्ती असेल तर या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, योग्य कागदपत्रे जोडून वेळेत अर्ज केला तर या योजनेचा त्यांना नक्कीच फायदा होईल. सरकारची ही मदत मिळवून देऊन आपण त्यांना फक्त आर्थिक मदत नाही देत तर त्यांचे पुढचे आयुष्य अजून जास्त सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी मदत करू शकतो.
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना काय आहे?
Divyang Vivah Protsahan Yojana ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे ज्या मधे दिव्यांग व्यक्तींना लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?
दिव्यांग आणि अव्यांग विवाहासाठी ₹1.50 लाख तर दिव्यांग आणि दिव्यांग विवाहासाठी ₹2.50 लाख मदत मिळते.
या योजनेसाठी कोण पात्र आहे?
ज्या व्यक्तींना कमीत कमी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे आणि त्यांच्या कडे UDID कार्ड आहे, ते Divyang Vivah Protsahan Yojana साठी पात्र आहेत.
UDID कार्ड अनिवार्य आहे का?
हो अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे वैलिड UDID कार्ड किंवा दिव्यांगत्वचे प्रमाणपत्र असले पाहिजे.
अर्ज किती दिवसांच्या आत करावा लागतो?
लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करावा लागतो, त्या शिवाय तुम्हाला Divyang Vivah Protsahan Yojana योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेसाठी विवाह नोंदणी आवश्यक आहे का?
हो लग्न हे कायद्यानुसार नोंदणीकृत असले पाहिजे ते आवश्यक आहे.
अनुदानाची रक्कम कशी मिळते?
अनुदानाची पूर्ण रक्कम DBT प्रोसेस ने पती आणि पत्नीच्या जॉइंट बँक खात्यात जमा केली जाते.
मिळालेली संपूर्ण रक्कम वापरता येते का?
नाही, तुम्हाला मिळालेल्या रकमेपैकी 50% रक्कम 5 वर्षांसाठी FD मध्ये ठेवावी लागते, त्या आधी पूर्ण रक्कम वापरता येत नाही.
या योजनेचा लाभ दोन वेळा घेता येतो का?
तर नाही, लाभार्थी व्यक्तीला या योजनेचा लाभ फक्त एकाच वेळा घेता येतो.
अर्ज कुठे करावा लागतो?
तुम्हाला अर्ज हा संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी किंवा जिल्हा परिषद कार्यालयात करता येतो.



